Tuesday, March 15, 2011

आग

आग
कशी काय कुणास ठाऊक
एका रात्री आग लागते
जळून खाक होतात झोपड्या
थोडक्यात सारं निभावतं
मनुष्यहानी मात्र होत नाही

बंबवाले येतात,आग विझवतात
पोलिस येतात,चौकशी करतात
मिडियावाले येतात कव्हरेज देतात
नेते येतात आश्वासन देतात
वाईट वाटत राहतं,तुम्हां आम्हांला
गरीबांच्या डोक्यावरचं छप्पर गेल्याच

एवढी मोठ्ठी आग लागूनही
नुकसान काही झालं नाही
हे मनाला खटकत राहतं.
चार दिवसांनींच तिकडे
कुठलस नगर उभ राहतं
हक्काची जागा मिळते त्या गरीबांना (?)
आणि एक गठ्ठा मतांची हमी
त्या सत्तेवर असलेल्या पक्षाला...त्या सत्तेवर असलेल्या....
-ज्योती कपिले
Publish Post

No comments: